आधुनिक भारतात आता खूप प्रगती झालेली आहे. सर्वच क्षेत्रात प्रगती झालेली दिसून येते. मुलींना पूर्वी शिक्षणापासूनच नाही तर सर्वच गोष्टींपासून वंचित ठेवले जात होते. जातीवाद देखील पूर्वी खूप मानला जायचा अजून देखील मानला जातो पण खूप कमी प्रमाणात. शिक्षणामुळे सर्वच क्षेत्रात प्रगती झालेली आहे. शिक्षणामुळेच सत्य परिस्थितीची जाण लोकांना झाली.
शिक्षण हे किती गरजेचे आहे हे थोर समाजसुधारकांनी जनतेला दाखवून दिले. सावित्रीबाईंनी मुलींना शिक्षण देऊन खूप मोठे काम केले आहे. आज प्रत्येक क्षेत्रात मुली मुलांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात. मुलींनी असे काम करून दाखवले आहेत कि जे मुलांना देखील शक्य होत नाही. वैमानिक असो, ड्राइवर, वैज्ञानिक कोणत्याच क्षेत्रात मुली मागे राहिल्या नाहीत.
आज मुलींनी भली मोठी रेल्वे चालवली आहे ते पाहून तुम्हाला असल्याचा गर्व वाटेल आणि मुलींचा अभिमान वाटेल. या मुलींनी अनेक मुलींसाठी आदर्श बनल्या आहेत. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता कि कश्याप्रकारे त्यांनी रेल्वे चालवली. मुलींना जर शिक्षणापासून वंचित ठेवले नसते, त्यासोबत जर त्यांवर बंधने लादली नसती तर त्यांनी आज किती प्रगती केली असती.
पहा व्हिडीओ: